करोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात सीईटी परीक्षा केंद्र वाढवली, ‘या’ तालुक्यात होणार व्यवस्था
राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची माहिती
नगर : सीईटी परीक्षेसाठी यापूर्वी फक्त अहमदनगर शहरात केंद्र होते. विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी शासनाने यंदा अहमदनगर शहरासह राहता, संगमनेर, कोपरगाव व श्रीगोंदे शहरात देखील परीक्षाकेंद्रे सुरू केली आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांसाठी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. परीक्षा केंद्रे वाढविल्यामुळे अहमदनगर शहरातील केंद्रांची क्षमता वाढली आहे. 4 हजार विद्यार्थ्यांव्यतिरिक्त अधिक 12 हजार मुलांची आपल्या जिल्ह्यातच परीक्षा देण्याची सोय झाली आहे. फक्त काही मुलांना पुणे शहरात परीक्षा द्यावी लागणार आहे, अशी माहिती उच्च शिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी व्टिटरवर दिली आहे.
Post a Comment